Thursday, April 07, 2011

अगदी सहजपणे जवळ आलो होतो,
तितक्याच सहजपणे दुरही झालोच ना.
फक्त तितक्या सहजपणे तुझ्या आठवणींपासून दूर नाही होता येत.


पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कारण असून रडतही नाही मी आजकाल.

पूर्वी सोबत चालताना वाटेचं भानच नसायचं,
आज एकट्या माझ्याकडे बघताना वाटेला कससच वाटतं.
स्वतःसाठी नव्हे मी तिला वाईट वाटायला नको म्हणून वाट टाळतो.

तू भेटण्या आधी गुलाबाचा गंधच कळला नाही,
तू गेल्यावर सुकलेलं गुलाबही जपून ठेवलंय.
सवय आहे मला,तुझ्या बाबतीतही मी असंच तर केलंय.

हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.

एकदा तू विसरलेला रुमाल आठवल्यावर आलेलीस घ्यायला,
मी हि तो छान घडी करून जपून ठेवला होता,
आता मला विसरलीयेस, स्वताला तसं जपणं कठीण आहे मला.
"जगण्या साठी पण वेळ नाहि......"
सारी सुखे पदरात आहेत
पण हसुन बघायला वेळ नाहि.
ह्या धावपळीच्या जिवनामधे
जगण्या साठी सुध्धा वेळ नाहि.

आईचे उपकार सदा स्मरतो
पण विचार पुस करायला वेळ नाहि.
सारी नाति तर मोडुन पडलीत
त्याना पुरायला पण वेळ नाहि.

सारी नांवे मोबाइल मधे आहेत
पण फोन करायला वेळ नाहि.
दुस~याना देण्याबद्दल काय बोलु
घरच्यांना द्यायला क्षण भर वेळ नाहि.

डोळ्यावर झोपेची झापड आहे,
झोप घ्यायला वेळ नाहि.
मन वेदनेन भरल आहे,
पण रडण्यासाठी वेळ नहि.

कमवण्याच्या शर्यतित असा पळतोय,
कि थकण्याला पण वेळ नाहि
दुस~यांच्या मनांचा काय करु विचार
स्वत:च्या स्वप्नासाठी सुध्ध वेळ नाहि

हे जिवना तुच आता सांग
ह्या आयुष्याच काय होणार,
प्रत्येक क्षणाला मरणारे आम्हि
जगण्या साठी पण वेळ नाहि......
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!

महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!

मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!

थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत ये!

Thursday, March 31, 2011


तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !

प्रेमात असं थांबायच नसतं,मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं


माझ्या मनात काय आहे,ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !

तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते
तुझ्यात असलेली मी पाहुन
गालातल्या गालात हसते


कधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटतात


तो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला

तु समोर असल्यावर
आसपास कुणी नसाव
एकसारख तासन्तास
वाटतं पहात बसाव

त्या दिवशी निरोप घेताना
माझ्याकडे बघुन गालात हसलीस
पहिल्यांदाच काळजात धक होऊन
मनात माझ्या रुतुन बसलीस

मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मनात आठवत राहिल
दिलासा देणारं तुझं बोलण
मनाला नेहमीच हसवत राहिल

तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो
जसा थंडीच्या दिवसातील गारठा
क्षणार्धात निघुन जातो

सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले

माझ्यासमवेत जगताना
तू किती भावुक होतोस
सर्व काही मलाच देऊन
तू रिकामा कसा राहतोस

तुझ ते झुरने मला
त्यावेळेसच जाणवले होते
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पानावले होते

माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद

हे सांगू की ते सांगू करत
तेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी
माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले


तुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो

तू अशी लाजलिस की
मलाही काही सूचत नाही
तुज़े मुरकने पहिल्याशिवाय
मला चैन पडत नाही